Focus (एकाग्रता)
मित्रांनो जपान मध्ये एक सुपर कॉम्प्युटर बनवण्यात आला. ज्यात 7,05,024 एवढे प्रोसेसर आणि 14,00,000 GB एवढा रॅम होता. या कॉम्पुटर ला मानवाचा मेंदूच्या 1 सेकंड्स चे काम करायला तब्बल 40 मिनिट लागले. आता विचार करा आपला मेंदू किती शक्तीशाली असेल. या शक्तीशाली मेंदूनी आपण काहीही करू शकतो पण सर्वकाही करू शकत नाही. हो सुपरकॉम्पुटर पेक्षा वेगवान अश्या आपल्या मेंदूला एक खूप मोठी मर्यादा आहे. ती म्हणजे हा ऐका वेळी एकच काम करू शकतो. पण हे आजकाल कोणाला कळतच नाहीये.
एकाग्रतेची व्यख्या आणि महत्व:
तुम्हाला एकाग्रता म्हणजे काय माहिती असेलच तरीही, हा पूर्ण लेख समजण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर एकाग्रता म्हणजे नेमके काय हे समजणे आवश्यक आहे. तर एकाग्रता म्हणजे एखादं काम करते वेळी दुसरे कोणते काम न करणे किंवा दुसऱ्या कोणत्या कामाचा विचार न करणे होय.
आजकाल च्या जीवनात खूप जास्ती अडथळे आहेत. त्यात मुख्य म्हणजे स्मार्टफोन आणि social Media होय. जेंव्हा कधी तुम्ही एकाग्र होण्याचा प्रयत्न करता तेंव्हा व्हाट्सअप चा एकदा मेसेज येतो आणि त्यात आपण एखादा तास रमतो. परत एकाग्र होऊच शकत नाही. जवळपास 80 टक्के तरुण पिढी या गोष्टीपासून त्रस्त असेल.
आजकालच्या या अडथळ्या नी (distractions) जसे व्हाट्सअप, फेसबुक, स्मार्टफोन इत्यादी नी भरलेल्या जीवनात एकग्रता ही एक कौशल्य (skill) बनली आहे. या skill चा उपयोग करून जो कोणी काम करतो तो इतरांपेक्षा लवकर आणि उत्तम काम करतो आणि यशस्वी होतो.
एकग्रता वाढविण्यासाठी चे काही उपाय
1) लहान सुरुवात करा.
जिम ट्रेनर त्याला पहिल्या दिवशी लहान सहान व्यायाम करायला लावेल, कारण आणखी त्याचे शरीर मोठे व्यायाम करण्यास सर्मथ नसेल. तसेच आपल्या मेंदूचं देखील आहे. तुम्हाला लहान गोष्टी एकाग्र होऊन करावं लागतिल.
2) संयम आणि इच्छाशक्ती
आता यात चॉकलेट म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी, कामापासून किंवा अभ्यासा पासून दूर घेऊन जाती ती गोष्ट होय. जसे व्हाट्सअप्प स्मार्टफोन इत्यादी. आणि तुम्ही म्हणजे विध्यार्थी होय. आता तुमच्या मधील इच्छाशक्ती किंवा संयमच तुम्हाला ते चॉकलेट खण्यासपासून वाचवू शकते. इच्छाशक्ती देखील एकदम येणारी गोष्ट नाही त्याला देखील हळू हळू वाढवी लागेल.
3) नियंत्रण
आपण रागात किंवा इतर भावनेत आपल्या वरचा ताबा सोडून देतो. परिणामी दुःखशिवाय काहीच हाती लागत नाही. या उलट आपण कोणत्याही परिस्थितीत आपल्या वरचा ताबा जाऊ दायचं नसतो. आपले सगळे इंद्रिय आपल्या ताब्यात हवेत, आपण इंद्रियांच्या ताब्यात नकोत. एकाग्रतेसाठी हे सर्वात महत्त्वाचे आहे.
4) योग
योग तुमच्या मेंदूला रिलॅक्स करेल ज्याने तुमच्या भावणा तुमच्या ताब्यात राहतील याने तुमचे शरीर तुमच्या नियंत्रणात राहील व तुम्ही तुमच्या मनाला देखील कण्ट्रोल करू शकाल आणि चांगले एकाग्र होऊन आभास इत्यादी करू शकाल. तुम्ही जेवढे स्वतःला स्वतःचा ताब्यात ठेवाल तेवढं आयुष्यात यशस्वी व्हाल.
शेवटी कसा वाटला हा लेख कॉमेंट करून प्रतिक्रिया कळवा आणि आमचे फेसबुक पेज मराठी मोटिव्हेशन ला लाईक करायला विसरू नका.
https://biology.stackexchange.com/questions/19767/supercomputer-vs-human-brain.
मस्त.